संध्यानंद.काॅम
झरीना खान (वय वर्षे 23) दरवर्षी ऑक्टाेबर महिन्याची आतुरतेने वाट पाहते. या काळात ती तिची स्पेनमध्ये राहणाऱ्या मैत्रिणीला आलियाला भेटते. या दाेघींची पहिली भेट 2022 मध्ये जयपूरमधील एका हाॅटेलच्या स्विमिंग पूलपाशी झाली हाेती. आलिया झरीनापेक्षा 30 वर्षांनी माेठी आहे. झरीनाच्या वयाची तिला एक मुलगी आहे आणि ती स्वतःचा कपड्यांचा ब्रँड चालवते, ज्यानिमित्त ती दरवर्षी भारतात येते. केवळ एका साध्या गप्पांतून सुरू झालेली ही मैत्री आता एका वार्षिक परंपरेत रूपांतरित झाली आहे. ‘आम्ही स्विमिंग पूलपाशी बसताे आणि गेल्या वर्षभरात आमच्या आयुष्यात काय घडले यावर गप्पा मारताे,’ असे झरीना सांगते. त्यांच्यासाठी हे ठिकाण, एक सुरक्षित मन माेकळे करण्याचे केंद्र बनले आहे.
कुटुंबांची जडणघडण : त्यांची ही वार्षिक भेट कदाचित वैयक्तिक असू शकते, पण मित्र, कुटुंबीय किंवा जाेडीदारांमधील असे भेटीचे विधी आजकाल सामान्य झाले आहेत. मग ते दरवर्षी एकमेकांच्या वाढदिवसाला एखादा हाॅरर सिनेमा एकत्र पाहणे असाे, दर रविवारी कुटुंबासाेबत दुपारचे जेवण घेणे असाे किंवा पालकांसाेबत सकाळी चहा घेण्याची वेळ असाे; या छाेट्या गाेष्टी नातेसंबंधात जिव्हाळा आणि एकमेकांसाठी आधार निर्माण करतात. मानसशास्त्रामध्ये या पद्धतींना रिलेशनल रिचुअल्स असे म्हटले जाते. काैटुंबिक पद्धतीच्या सिद्धांतानुसार, असे विधी हे कुटुंबाच्या संस्कृतीचा भाग असतात. मानसाेपचारतज्ज्ञ मानतात की, ‘अशा कार्यक्रमांमुळे नातेसंबंधात ओढ, आपुलकी आणि सातत्य निर्माण हाेते, ज्यामुळे सुरक्षिततेची भावना मिळते.’ अंतराचा अडथळा दूर करणे : जेव्हा प्रत्यक्ष भेटीगाठी दुर्मीळ हाेतात, तेव्हा अशा लांब पल्ल्याच्या परंपरा राखणाऱ्या भेटी खूप महत्त्वाच्या ठरतात.
दिल्लीतील नातेसंबंधातील तद्न्य कृती अस्थाना आणि तिची मैत्रीण कृती मॅकरेन (दाेघींचे वय 44 वर्षे) यांनी गेली दाेन दशके एकमेकींच्या भेटीच्या आठवणी म्हणून चांदीच्या अंगठ्या साभांळून ठेवल्या आहेत. त्यांची भेट 2004 मध्ये अमेरिकेत एकत्र काम करताना झाली हाेती. कृती भारतात परतल्यावरही ही परंपरा अखंड राहिली. त्या दर दाेन वर्षांनी भेटतात, एकमेकींच्या आयुष्यात काही काळ सहभागी हाेतात आणि कधी कधी आपल्याकडील माैल्यवान वस्तूंची भेट म्हणून अदलाबदल करतात. डाॅ. अस्थाना यांच्या मते, ‘ही देवाणघेवाण केवळ वस्तूंची नसून ती एक सांस्कृतिक देवाणघेवाण आहे.’ मानसाेपचारतज्ज्ञ म्हणतात की, ‘असे पाॅवरफुल टचपाॅईंट्स (गाठीभेटी) नात्यात ‘रिलेशनल रिझर्व्ह’ (भावनिक साठा) म्हणून काम करतात, जाे एकटेपणात मैत्रीला आधार देताे. सुरेश कुमार सारखे व्यावसायिक देखील आपल्या महाविद्यालयीन मित्रांसाेबत गेली कित्येक वर्षे दर दाेन आठवड्यांनी एकाच ठराविक ठिकाणी भेटून गप्पा मारतात.
त्यांच्यासाठी भेटणे महत्त्वाचे आहे, कुठे आणि कधी हे आधीच ठरलेले असते. एकमेकांच्या आयुष्यात हाेत असलेले बदल आणि मनातील वादळांना या भेटींमधून वाट काढता येते. विविध शहरांमध्ये राहणाऱ्या मित्रांना वारंवार भेटत राहणे शक्य नसते. त्यामुळे, ते एकदा वेळ आणि ठिकाण ठरले, की भेटायची संधी कधीच घालवत नाहीत.
काैटुंबिक नात्यांना बळकटी : नातेसंबंधांमध्ये अनेकदा आपण आपल्या जवळच्या, कुटुंबातल्या व्यक्तींना गृहीत धरताे. पण दरराेजच्या छाेट्या कृती, वार्षिक उत्सव किंवा आठवड्याच्या शेवटी एकत्र बाहेर जाणे यांसारखे कार्यक्रम नात्यात एक सामायिक ओळख निर्माण करतात. दिल्लीतील वेडिंग प्लॅनर तन्वी कांता (वय 37 वर्षे) आणि त्यांचे संयुक्त कुटुंब दर रविवारी चर्चमधील प्रार्थनेनंतर एकत्र जेवणासाठी जमतात. तन्वी म्हणतात, ‘माझ्या आजीचा नेहमीच आग्रह असे की, आपण कुटुंबांनी अगदी छाेट्या गाेष्टींचेही सेलिब्रेशन केले पाहिजे आणि एकत्र जेवण केले पाहिजे. या छाेट्या परंपरांमुळेच कठीण काळात कुटुंब एकत्र राहते. नातेसंबंध जपणे आणि त्याचा आनंद सर्वांना देणे, कुटुंबाना बळकटी देते.
नात्यांशिवाय आयुष्य : अनेकांना प्रश्न पडताे की, अशा कार्यक्रमांशिवाय नातेसंबंध विशेष नसतात का? काॅर्पाेरेट वकील सॅम गिरी (वय 44 वर्षे) यांचे उत्तर ‘नाही’ असे आहे. त्यांनी आणि त्यांच्या एका जवळच्या मित्राने गेली 20 वर्षे दर शनिवारी एकत्र स्क्रॅबल खेळण्याची परंपरा जपली आहे. आता गाेव्याला स्थलांतरित झाल्यानंतरही, ते वर्षातून एकदा तरी भेटून आपला खेळ खेळतात. त्यांच्यासाठी ही केवळ एक गंमत नाही, तर ती त्यांच्या मैत्रीची दृढता टिकवून ठेवणारी गाेष्ट आहे. तज्ज्ञ म्हणतात की, ‘मैत्रीचे कार्यक्रम नेहमीच खूप माेठे किंवा खर्चिक असावेत असे नाही. ते 10 मिनिटांच्या फाेन काॅल इतके साधे किंवा एकत्र काेडे साेडवण्यासारखे असू शकतात. महत्त्वाचा आहे ताे ‘उद्देश’ आणि त्या नात्यासाठी दिलेला ‘वेळ.’