मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या काेल्हापूर, सांगली पूरनियंत्रण प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाला आहे. ‘ट्रक्टेबल’ या जगप्रसिद्ध संस्थेने हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचा अहवाल सादर केल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.आता या प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. दुष्काळनिर्मूलन आणि पूरनियंत्रण या दाेन्ही बाबी समाेर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.जागतिक बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याने या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी यशस्वी पाऊल पडल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.
काेल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून वाहून जाणारे पुराचे 50 टीएमसी पाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी उपलब्ध हाेणार आहे. जागतिक बँकेच्यतांत्रिक सल्लागार असलेल्या संस्थेला प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे निर्दे श देण्यात आले हाेते. आता ताे अहवाल प्राप्त झाल्याने प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेस गती मिळणार आहे.अंदाजे 15 हजार काेटींच्या या प्रकल्पातून साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. कृष्णा खाेऱ्यातून समुद्रात वाहून जाणारे 50 टीएमसी पाणी 93 कि.मी. लांबीच्या बाेगद्यातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने उजनी धरणात वळवण्याचा प्रस्ताव आहे.