मला हुकूम करायचा तुला काहीएक अधिकार नाही. तू काही मालक नाहीस.’ मग ते घर पडत जातं. भिंती काेसळतात, विटा पडतात. पण बांधकाम दुरुस्ती करणारा काेणीही नाही. कचराही निघत नाही. त्याचे ढीग साचत जातात. पण सगळ्यांचा आव मात्र मालक असल्याचा. आत जवळजवळ आपला आत्मा असाच झाेपलेला असताे, जणू हजर नाहीच.ऐकलाय का आपल्या आत्म्याचा आवाज आपण कधी? हाे, आपण राजकीय पुढारी वगैरे असाल तर ऐकला असेल. म्हणूनच तर मागच्या निवडणुकीच्या वेळी..सर्व पुढारी आत्म्याचा आवाज ऐकतात. ज्या दिवशी पुढाऱ्यांच्या आत्म्यात आवाज उमटू लागेल, त्यादिवशी जगात काेणीही पापी राहणार नाही. ज्यांच्यापाशी नावालादेखील आत्मा नाही, त्यांना आवाज ऐकू येताहेत! आणि हे आवाज देखील बदलून जातात. सकाळी एक आवाज ऐकू येताे तर संध्याकाळी दुसराच आवाज.
आत्मे पण माेठा राजकीय स्टंट खेळतात! आपण कधी आत्म्याचा आवाज ऐकला आहे का? आपण पुढारी नसाल तर कधीच ऐकला नसेल.आपणाला फ्नत इंद्रियांचेच आवाज ऐकू येत असतात.कधी एक इंद्रिय म्हणते, ‘हे पाहिजे’ कधी दुसरे इंद्रिय म्हणते, ‘ते पाहिजे’ कधी तिसरे इंद्रिय म्हणते, ‘हे नाही मिळाले तर आयुष्यच फुकट.’ चवथे इंद्रिय म्हणते, ‘लाव, लाव, सगळी श्नती पणाला लाव या गाेष्टीवर.ही गाेष्ट म्हणजेच जीवन सर्वस्व.’ पण जे जीवन आत लपून आहे त्याचा आवाजही कधी ऐकलात का? त्याला कुठलही आवाज नाहीये.कृष्णाचं म्हणणं आहे की, अशी अवस्था ही आपण आपलेच शत्रू असल्याची अवस्था आहे. अन् गुलामी तर फारच भयंकर असते. खुद्द इंद्रियांना जे नकाे असतं तेही इंद्रिये माणसाकडून करवून घेतात. आपल्यालाही याचा कित्येकदा अनुभव आला असेलच.