उद्याेगांचे सर्व परवाने आता मैत्री पाेर्टलवरून मिळणार

02 Aug 2025 23:05:57
 
 

CM 
महाराष्ट्र उद्याेग क्षेत्रामुळे 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे उद्याेगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते व कनेक्टिव्हिटी, पर्यावरण मंजुरी, वन परवानग्या, मजूर कायदे, जमिनीचे वाटप या सर्व साेयीसुविधा तात्काळ उपलब्ध् करून दिल्या पाहिजेत.उद्याेगांना सर्व परवानग्या ऑनलाइन मिळाव्यात यासाठी मैत्री पाेर्टल विकसित करून त्यावरच सर्व परवानग्या द्याव्यात.
त्याचबराेबर उद्याेजकांना शासकीय विभागांसदर्भात काही अडचणी असतील, तर त्या संदर्भात निनावी तक्रारीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित मुद्यांवर बैठक झाली.
 
या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, उद्याेग विभागाचे सचिवडाॅ.पी. अन्बलगन, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भाेज, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकासआयु्नत दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्यासह अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
उद्याेगांना जलसंपदा विभागाने पाणी उपलब्ध करून द्यावे. माजलगाव, दिघी, बुटीबाेरी, चामाेर्शी (गडचिराेली), जयपूर (छत्रपती संभाजीनगर) आणि पीएम मित्रा (अमरावती) येथे वीज उपकेंद्रांच्या उभारणी कामाला प्रथम प्राधान्य द्यावे.उद्याेगांसाठी वीजवहन आणि देखभाल समस्यांसंदर्भात वेगळी व्यवस्था करावी.पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या मैत्री पाेर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून द्याव्यात. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने शेंद्रा-बिडकीन मार्ग समृद्धी महामार्गाला जाेडण्यासंदर्भात कार्यवाही करावी. नवीन उद्याेगांनी बुटीबाेरीस जास्त पसंती दिल्याने त्या भागातील राेड कनेक्टिव्हिटी तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.राज्यातील उद्याेगांना सर्व परवानग्या वेळेत मिळाव्यात, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की उद्याेगांना लागणाऱ्या अनावश्यक परवानग्या बंद कराव्यात.उद्याेगांना जमिनी देण्यासंदर्भात सुधारित परिपत्रक करावे.
Powered By Sangraha 9.0