राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू असलेल्या विविध रस्ते विकासकामांचा वेग वाढवा; तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मान्सूनआधी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कामात हयगय करणारे कर्मचारी, अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा शिंदे यांनी घेतला.ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अधिकारी उपस्थित हाेते.मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण हाेणार नाही, त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीयाेग्य बनवावा.
रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लाॅक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिनाभरात पूर्ण करावे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत करावी, असे स्पष्ट निर्देश शिंदे यांनी दिले.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वांत अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हेकाम अत्यंत अवघड असल्याने ते नियाेजनबद्ध पूर्ण करावे; तसेच हे काम येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण हाेणार असून त्यानंतर ताे प्रवाशांसाठी खुला हाेईल.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हाेणारी वाहतूक काेंडी लक्षात घेता हा महामार्ग सहाऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
काेकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस- कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभाेळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे.यातील काही पुलांची कामे प्रगतिपथावर असून, या कामांची गती वाढवावी, प्रस्तावित काेकण द्रुतगती एक्सेस कंट्राेल महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी, असे शिंदे यांनी सांगितले. महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर विकसित करण्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले असून, तेथे सुरू असलेल्या कामांचा आढावाही शिंदे यांनी घेतला.तापाेळ्यातील उत्तेश्वराच्या मंदिराचे काम, उत्तेश्वर राेप-वेच्या कामाचीही प्रगती त्यांनी जाणून घेतली.