तुमच्या मुलाला माफी मागायला शिकवा

    02-May-2025
Total Views |
 
 

Sorry 
 
फ्नत साॅरी म्हणणे खराेखरच महत्त्वाचे आहे? काही मुलांना केलेल्या चुकीचा कधीही पश्चात्ताप हाेत नाही. वारंवार सांगूनही त्यांच्यात सुधारणा हाेत नाही.गैरवर्तन केल्यानंतर पुन्हा पुन्हा साॅरी म्हणण्यात काय अर्थ आहे? एक आई-वडील त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला क्लिनिकमध्ये आणतात. आई- वडील वारंवार मुलाला खेळणं फेकू नकाेस म्हणूृन बजावत आहेत आणि मला माफ कर म्हणतात परंतु उभे राहून मुलाला थांबवत नाही. मी उठताे, मुलाचा हात पकडताे, खेळणं उचलताे आणि त्याचे लक्ष बाॅल खेळण्याकडे वेधताे.नंतर मी त्या मुलाला ताे आधी जे खेळणं फेकत हाेता, त्या खेळण्याला थाेपटण्याचे आणि त्या खेळण्याची माफी मागण्याचे सांगितले, जे मुलाने खुशीने केले. आई-वडील आश्चर्यचकित झाले आणि नंतर मला म्हणतात की, डाॅक्टर, मुलाने माफी मागितली कारण की ताे तुम्हाला घाबरताेय. जेव्हा आम्ही त्याला रागावताे किंवा त्याला माफी मागायला सांगताे तेव्हा ताे कधीच आमचे ऐकत नसताे.
 
एक वडील केबिनमध्ये दाखल हाेतात. त्यांच्या मागून जे मूल येत हाेतं ते फारच लहान हाेतं. मुलाच्या मागे दरवाजा बंद व्हायला लागताे आणि त्याचा हात दरवाजात येताे आणि ताे रडायला लागताे. आई-वडील मुलाच्या अशा बेदरकार वागण्याने रागावून त्याला थप्पड मारतात. मुलगा आणखी जाेराने रडू लागताे. आई-वडिलांच्या अशा वागण्याने मुलाला वाईट वाटले. दरवाजा उघडा न ठेवल्याबद्दल माफी मागण्याऐवजी आई-वडील मुलाला रागावले. काय हे स्वाभाविक नव्हते की भविष्यात मुलगाही त्यांच्याप्रति सहानुभूती दाखवेल? मुलांच्या विकासाच्या दृष्टीने पाहता मूल दाेन वर्षांच्या आसपास लज्जा/संकाेच आणि अपराधीपणाची भावना दर्शविण्यास सुरुवात करते. अहंपणा ही भावना तीन वर्षांच्या आसपास विकसित पावते. स्व-छबी, जबाबदारी आणि सामाजिक जाणीव या आणि अशा भावना सात वर्षांच्या वयापर्यंत हळूहळू निर्माण हाेतात.
 
या भावना मुलाच्याव्य्नितमत्त्वाच्या सकारात्मक किंवा नकारात्मक पैलूंमध्ये कशारितीने विकसित पावतील, हे आई- वडिलांच्या शैलीवर अवलंबून असते. जेव्हा मूल त्याच्या स्वतःच्या वर्तनाप्रति त्याच्या जबाबदारीसह जाेडले जाते तेव्हा त्याच्या भावाचे आवडते खेळणे ताेडल्याबद्दल त्याच्यात अपराधाची भावना जागृत हाेते. जर त्याच्या स्वछबीवर परिणाम झाल्यास त्याला त्याचे वागणे लज्जास्पद वाटेल. जेव्हा आईवडील किंवा माेठी माणसे सकारात्मक शैलीचा वापर करून आणि मुलाला त्याच्या कृतींचे परिणाम, वस्तूंची देखभाल करण्याचे महत्त्व शिकवतील आणि त्याच्या चांगल्या वर्तनाला प्राेत्साहन देतील, तेव्हा मूल दिलगिरी व्हायला शिकेल.
त्याऐवजी मुलाला जाहीरपणे टीका टिपण्णी केल्यास किंवा अपमानास्पद शब्दांचा वापर करून किंवा साॅरी म्हणण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकल्यास मूल जास्तच काेडगे हाेऊ शकते.
 
जेव्हा मूल वारंवार एकच चूक करीत असेल आणि साॅरी म्हणून तिथून पळ काढत असेल तर ती एक समस्या आहे.ही समस्या असे दर्शविते की मुलाला त्याच्या वर्तनाच्या परिणामाची काेणतीही जाण नाही.थाेडक्यात, माफी मागणेच महत्त्वाचे नाही, दिलगीर हाेणेही महत्त्वाचे आहे. जेव्हा मूल दिलगीर व्हायचे शिकत असते, तेव्हा त्याचा अर्थ हा असताे की मूल त्याच्या कृतींच्या परिणामांनाही समजते. ते त्याच्या कृतींची जबाबदारीही स्वीकारते आणि म्हणूनच भविष्यामध्ये उपराे्नत चुका सुधारण्यासाठी काम करेल. मूल अंतःकरण निर्मळ ठेवेल.त्याच्या अंतःकरणातील आवाज त्याला चांगले बनायला आणि चांगले करायला मदत करेल. म्हणूनच माफी मागायला शिका. तुमचे मूलसुद्धा तुमचेच अनुकरण करेल.