आपण आपल्या खऱ्या आयुष्याची तुलना इतरांच्या दिखाऊ क्षणांशी करताे आहाेत. सर्वजण फेसबुकवर आपल्या आयुष्यातले उत्तम क्षणच दाखवतात. जसं क्रिकेट सामन्यांचे हायलाइट्स पाहताे. त्यात सगळी महत्त्वाची वा चांगल्या फलंदाजीची दृष्यच असतात. क्वचितच हायलाइट्समध्ये एखादी धाव घेतलेली ओव्हर दाखवतात. तसंच, जर आजचा दिवस कंटाळवाणा वा उदास गेला असेल तर त्याचे अपडेट काेणी टाकत नाही. आपण आपल्या कंटाळवाण्या दिवसाला वा मेडन ओव्हरला त्यांच्या रंजक दिवसासाेबत, चाैकार आणि षट्कारांसाेबत ताेलून पाहताे.पण प्रत्येकाच्या बॅटिंगमध्ये चाैकार, षटकार, डाॅट बाॅल वा कधी-कधी विकेट पडणं हेही हाेणारच. या नकळत हाेणाऱ्या तुलनेमुळे नकारात्मक विचार मनात घर करायला लागतात.
‘माझं आयुष्य किती कंटाळवाणं आहे’, ‘लाेक लाॅकडाउनचा किती छान वापर करतायत, पण मी काहीच करत नाहीय’, ‘लाेक काॅफी चॅलेंज, साडी चॅलेंज किंवा चित्रकला, नृत्य असे छंद आणि काय-काय करत आहेत, पण मी लाॅकडाउनचा वेळ वायाच घालवते/ताे आहे’, ‘लाेक कमी वयात किती यश संपादन करतात, मी फक्त धरणीला भार आहे’, ‘सगळ्यांची लग्न हाेत आहेत, मलाच कुणी कसं पसंत करत नाही’, ‘मी किती जाड आहे, माझी त्वचा किती खराब आहे’, ‘माझ्याकडे त्यांच्यासारखा युराेप सहलीसाठी पैसा नाही’, असे विचार कधी तुमच्या मनात डाेकावले आहेत का? अशा विचारांची यादी न संपणारी आहे. हे विचार वारंवार मनात डाेकावल्यानं मनाेविकार मूळ धरायला लागतात.
तुलनेबराेबरच स्वतःचं मूल्य आपल्या छायाचित्राला वा पाेस्टला मिळणाऱ्या लाइक्स व कमेंट्सवरून ठरवायला लागलाे आहाेत. आपल्यापैकी अनेकांनी एखाद्या फाेटाेला कमी लाइक्स मिळाले म्हणून ताे फाेटाे साेशल मीडियावरुन काढूनसुद्धा टाकला असेल. कारण आपण आपल्या स्वतःच्या दिसण्यावर वा आयुष्यावर इतरांच्या आलेल्या प्रतिक्रियांना गरजेपेक्षा खूपच जास्त महत्त्व देताे. हे मानसिक दृष्ट्या खूप हानिकारक आहे. आत्मविश्वास कमी हाेणं, स्वप्रतिमा खराब हाेणं, असे दुष्परिणाम यामुळे अनुभवायला लागतात.तरूण मुलांमध्ये अनेक हिंसक व्हिडीयाे गेम्स खूप वेळ खेळले जात आहेत.
त्यामुळे नकळत मुलांच्या मनावर वाईट परिणाम हाेत आहेत. त्यांच्या वर्तनात जाणवण्याइतपत नकारात्मक बदल दिसून आले आहेत.रात्री उशिरापर्यंत किंवा दिवसभरातून सुद्धा जास्त वेळ स्क्रिन चा वापर झाला, तर झाेपेचा दर्जा बऱ्याच अंशी खालावताे.झाेपेचं वेळापत्रक काेलमडल्यानेसुद्धा ही परिस्थिती उद्भवते. त्यामुळे विश्रांती पुरेशी मिळत नाही. अनेकदा नानाविविध स्वप्न पडत राहतात. तुम्हाला पडलेली आठवतात का तुम्ही जे स्क्रीनवर पाहत अथवा खेळत आहात त्यासंबंधीची स्वप्न? शिवाय या स्क्रीनटाईमचे डाेळ्यावर हाेणारे वाईट परिणाम तर सांगायलाच नकाे. आपण सर्वच ते जाणताे.म्हणूनच सतर्क राहूनच साेशल मिडियाचा वापर करा.