चा अनुभव निसर्गसान्निध्यात हाेताे. यात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकताे. काहींना संगीत ऐकून मेंदू शांत ठेवण्यास मदत मिळू शकते. काही या स्थैर्याचा लाभ स्वत:च्या देखभालीसाठीही करू शकतात. हा काळ कृतज्ञता दर्शविण्यासाठीही उपयुक्त आहे. यासाठी तीन अशा गाेष्टी आठवाव्यात ज्यासाठी आपण कृतज्ञ आहाेत. खरे तर जेव्हा आपण कृतज्ञता, प्रसन्नता आणि वास्तविक आनंदाचा अनुभव करू लागताे.तेव्हा नकारात्मक परिस्थितींमध्ये राहणे अश्नय हाेते.जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा मेंदूत गुंता हाेताे. तेव्हा प्रथम काय करायला हवे हे कळत नाही.अशा स्थितीत संतुलनाची गरज असते. अशा प्रसंगी स्थिरतेचा सराव आपल्याला स्वत:शी जाेडताे.
अंतदृष्टी : काही नवे शिकण्याची वा करण्याची इच्छा विकसित करा. याची सुरुवात पुस्तक वाचून, पाॅडकाॅस्ट ऐकून वा एखाद्या हुशार माणसांचे बाेलणे ऐकून करता येऊ शकते. कधी कधी एखाद्या पुस्तकातील एखादे वा्नय वा भाग आपल्यावर एवढा गाढ परिणाम करताे की, आपण सकारात्मक ऊर्जे ने भरून जाताे. यामुळे आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा व काही उत्तम करण्याची ऊर्जा मिळते. हीच वेळ एखाद्या गंभीर विषयात सखाेल जाण्यासाठीही उपयुक्त असते.
जेव्हा जे श्नय असेल ते करा : चांगली गाेष्ट ही आहे की आपण आपल्या महत्त्वाच्या दैनिक सवयींचा अभ्यास उपलब्ध वेळेनुसार करू शकताे. अर्थात काेणत्याही कामादरम्यान जेव्हा वेळ मिळेल तेव्हा याचे पालन करता येऊ शकते वा आपण इतर दैनिक कामंमध्ये या सवयी सामील करण्याची श्नयता शाेधे शकताे. उदा. घराची सफाई करताना याेग वा व्यायाम करता येऊ शकताे.याचप्रमाणे आपले फिरणे एक ध्यान लावण्याच्या फिरण्यात बदलता येऊ शकते.
महत्त्वाची गाेष्ट ही आहे की, त्या कामांसाठी थाेडा वेळ अवश्य काढा जे आपल्यासाठी गरजेचे आहे आणि स्वत:शी स्वत:ची काळजी घेण्याचा वायदाही करून घ्या.गतिशीलता याचा अर्थ व्यायामापासून याेगापर्यंत काेणतीही शारीरिक क्रिया असू शकते. दूर फिरायला जाणे वा चालणेही यात सामील करू शकता. कारण आपण शारीरिक शक्तींवर खूप विश्वास ठेवताे. नियमित क्रिया शरीर व मेंदू दाेन्हींसाठी फायदेशीर असतात. कारण यामुळे ऊर्जा व पाेषण मिळते. तसेच आपला स्वभावही चांगला राहताे. शरीराला वेदना व आखडण्यापासून आराम मिळताे आणि रात्री झाेपही चांगली येते. अर्थात चांगले वाटण्याचे सार गतिशीलतेत दडले आहे.
स्थैर्य : काेणत्याही गाेष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी ती समजण्यासाठी, काही ग्रहण करण्यासाठी आणि पुन्हा एक नवी सुरुवात करण्यासाठी स्थिर हाेणे आवश्यक असते. यात निसर्गात मिसळणे, वेळ घालवणे, लांब फिरायला जाणे व याेग आहे. तसेच या स्थिरतेत एक छाेटा भाग आपल्या मनातील भावना लिहिण्यासाठी व ध्यान करण्यासाठीही असावा. स्थिरतेत ऊर्जे