ओशाे - गीता-दर्शन

02 Dec 2025 22:00:54
 

Osho 
 
तुमच्याच पातळीवर उभी असलेली माणसं आहेत. त्यानं गुंतागुंत जास्त झाली. अवघडपणा वाढला. तर मग शत्रू-मित्र यामध्ये समभाव ठेवण्याची प्रक्रिया काय असेल? मित्र-शत्रू यात जाे समभाव ठेवू शकेल? म्हणून त्याची काही सूत्रे लक्षात घ्यायला पाहिजेत.
पहिलं सूत्र- जाे काेणी स्वतःसाठी दुसऱ्या काेणाचेही शाेषण करीत नाही. ताेच शत्रू-मित्र यामध्ये समभाव ठेवण्यात यशस्वी हाेऊ शकेल. जी व्य्नती स्वतःसाठी दुसऱ्या काेणाचीही पिळवणूक करत नाही. अशीच व्य्नती, जाे आपल्या उपयाेगी पडताे.
 
त्यालाच तर आपण मित्र म्हणताे. अशी म्हण आहे की, संकटकाळात मित्राची परीक्षा हाेते. म्हणजे जाे आपल्या उपयाेगी पडताे ताे मित्र आणि जाे आपल्या कार्यात अडथळे आणताे ताे शत्रू, यापेक्षा काही फरक आहे का? म्हणूनच मित्राचा कधीही शत्रू हाेऊ शकताे, त्यानं कार्यात अडचण आणली की ताे शत्रू झालाच म्हणून समजा. अन् जर शत्रूनेही तुमच्या कामात मदत केली तर ताे मित्र बनताे.जर तुमचं काहीही काम असेल तर मग समभाव ठेवणं तुम्हाला अश्नय आहे.काेणी माझा मित्र व्हायला, विराेधी व्हायला माझं काही कामच नाहीये. असे जाे म्हणताे ताेच शत्रू-मित्र यामध्ये समभाव ठेवू शकताे.
Powered By Sangraha 9.0