एमएमआर क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करा

    30-Jan-2025
Total Views |
 
 
 
 

CM 
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लाेकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा हाेण्यासाठी या क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबराेबरच भूसंपादन प्रक्रिया निश्चित कालमर्यादा निर्धारित करून तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व काेकण पाटबंधारे प्रकल्प) मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, मुख्य सचिव सुजाता साैनिक यांच्यासह संबंधित विभागांचे अतिर्नित मुख्य सचिव उपस्थित हाेते.एमएमआर क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा घटक आहेत.आगामी काळात जलव्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययाेजना करून हे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावेत.
 
या प्रकल्पांसंदर्भात वन विभागाची मान्यता, एमएमआरडीए, सिडकाे आदी यंत्रणांनी परवाने व इतर अनुषंगिक बाबींसंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामास गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.या क्षेत्रात जेथे सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत तेथील पाणी महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्याेगिक वापरासाठी घ्यावे. या पाण्यावर आणखी काही प्रक्रिया करता येते, का याबाबत अभ्यास करावा. एसटीपी प्रकल्पातील पाणी औद्याेगिक वापरासाठी घेण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी एमआयडीसी आणि नगरविकास विभागाची एकत्रित बैठक घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ठाणे, कल्याण-डाेंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी महापालिका क्षेत्रात पिण्यासाठी व औद्याेगिक क्षेत्रासाठी काळू नदी प्रकल्प महत्त्वाचा असून, हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावा. ठाणे व परिसरातील नवीन वसलेल्या भागाला अतिर्नित पाणी उपलब्ध करून द्यावे, असे शिंदे यांनी सांगितले.