राज्यातील दळणवळण सुविधा; तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियाेजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले.आगामी शंभर दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकाेरे- बाेर्डीकर, मुख्य सचिव सुजाता साैनिक यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुत, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित हाेते.
राज्यातील महामार्गांची उभारणी आणि रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियाेजन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. राज्यातील धार्मिक स्थळांना जाेडणाऱ्या आणि पर्यटन उद्याेगाला प्राेत्साहन देणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतिमानतेने करावयची असून, सर्वांना विश्वासात घेऊन त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणेपर्यंतचे 76 कि.मी.चे काम तत्परतेने पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा; तसेच या वर्षी समृद्धी महामार्गाची कर्जराेखे प्रक्रिया पूर्ण करावी.
प्रवाशांना उपयु्नत ठरणाऱ्यामुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 13.30 कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे कामही तातडीने पूर्ण करावे. मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीच्या उभारणीला सुरुवात करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतिमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी सांगितले. म्हैसकर यांनी विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियाेजनाबाबत माहिती दिली.