विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे गरजेची‘

    01-Jun-2024
Total Views |
 
 

ports 
भारत हजाराे वर्षांपासून महान सागरी राष्ट्र आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी कसाेशीने प्रयत्न हाेत आहेत. विकसित भारताचा राजमार्ग विकसित बंदरांमधून जाताे. त्यामुळे देशाला विकसित बनवण्यात देशातील बंदरांची भूमिका महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा (जेएनपीए) 35वा स्थापना दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बाेलत हाेते.मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलाेटा, अतिर्नित मुख्य सचिव संजय सेठी, पाेस्टमास्टर जनरल महाराष्ट्र किशन कुमार शर्मा, सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयु्नत राजेश पांडे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ, सचिव मनीषा जाधव व इतर मान्यवर उपस्थित हाेते.
 
गेल्या 35 वर्षांत जवाहरलाल नेहरू देशातील अग्रगण्य कंटेनर बंदर म्हणून उदयाला आले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत तांत्रिक क्षमता आणि धाेरणात्मक उपक्रमांमुळे ते जागतिक व्यापारातील प्रमुख बंदर म्हणून स्थापित झाले आहे. जवाहरलाल नेहरू बंदरामुळे कार्यक्षम मालवाहतूक सुनिश्चित झाली असून, त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्याेगिक विकासाला चालना मिळाल्याचे राज्यपालांनी सांगितले.या बंदरामुळे राेजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील 28 विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला राज्यातील विद्यापीठांसाेबत सहकार्य करण्याचे आवाहन करत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राज्यातील विद्यापीठांत सागरी व्यापार आणि बंदरांशी संबंधित अभ्यासक्रम व कार्यक्रमांची रचना करण्यासाठी प्राधिकरणाने सहकार्य करावे, असे आवाहनही राज्यपालांनी केले.
 
राज्यपालांच्या उपस्थितीत वाढवण येथील ग्रीनफिल्ड बंदराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) व पीएसएमध्ये; तसेच जेपीएनए आणि सीएमएसीजीएम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्याहस्ते सार्वजनिक खासगी भागीदारीतील (पीपीपी) निवडक प्रतिनिधींचा; तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राधिकरणाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते जेएनपीएचे विशेष आवरण व काॅर्पाेरेट कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले.जेएनपीएच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त तयार केलेल्या काॅफीटेबल पुस्तकाचे; तसेच भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित केलेल्या विशेष आवृत्तीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.