हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे या झाडाची पूजा केली जाते. काही विशेष पूजन कर्मामध्ये या झाडाच्या पानांचा मंडपही तयार केला जाताे. हे झाड भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लाेकांचे लग्न जमण्यास उशीर हाेत आहे, त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितले जाते. वास्तुनुसार केळीचे झाड घराच्या समाेर किंवा बागेमध्ये लावणे शुभ मानले जाते.भारतातील काही भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयाेग जेवण करण्यासाठी केला जाताे.यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहे. आज आम्ही तुम्हाला केळीच्या पानांवर जेवण केल्याने काेणकाेणते फायदे हाेतात या संदर्भात माहिती देत आहाेत.
केळीच्या पानांमधून मिळणारे फायबर चटई, जाड पेपर, पेपर पल्प बनवण्यासाठी उपयाेगात आणले जाते. केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पाेषक तत्त्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फाेडं अशा समस्या दूर हाेतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालाेकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पाॅलीफिनाेल्स अॅन्टीऑक्सीडेंट आढळतात.केळीच्या पानावर जेवण केल्यास हे अॅन्टीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे अॅन्टीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खाेबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक हाेतात.