जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी शेताला पाणी कमी पडते म्हणून 22 लाख रुपये खर्च करून 52 फूट खाेल शेततळे तयार केले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात या शेततळ्यात तब्बल दाेन काेटी लिटर पाणी साचले हाेते.आता हे पाणी शेताला देण्यासाठी त्यांना विजेची गरज भासणार नाही व भूमिगत पाण्याची पातळी वाढेल. यामुळे लक्ष्मण सुरडकरांच्या 21 एकर शेताला पुरेसे पाणी तर मिळेलच; पण आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांच्या शेतालाही पाण्याचा ओलावा मिळून पीक जाेमदार येईल.