अमळनेर, 30 नोव्हेंबर (वि.प्र.) :
97 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुढच्या वर्षी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 ला संपन्न होणार आहे. या संमेलनात कविकट्टा हा विशेष लोकप्रिय कार्यक्रम देखील आयोजित करणार असल्याची माहिती संमेलनाच्या संयोजकांनी दिली. कविकट्टा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व नियोजन करण्याच्या संदर्भात विचार करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यवाह नरेंद्र दि. निकुंभ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला कविकट्टाचे प्रमुख संयोजक राजन लाखे (पुणे). मंडळाचे उपाध्यक्ष व कविकट्टाचे समन्वयक रमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कविकट्टाच्या आयोजनाचे समन्वयक रमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कविकट्टाच्या आयोजना संदर्भात सविस्तर चर्चा केली. राजन लाखे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी म.वा. मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, सौ. वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, साहित्यिक प्रा.बी.एन. चौधरी, विलास पाटील, दिनेश नाईक, भाऊसाहेब देशमुख, रमेश धनगर, डॉ. कुणाल पवार, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनीता पाटील, प्रतिभा पाटील, विवेक जोशी, रत्नाकर पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण पाटील, पूनम साळुंखे इ. मान्यवर देखील उपस्थित होते. कविकट्टासाठी प्राप्त झालेल्या कवितांमधून 200 कवितांची निवड करून या कविता लिहिणाऱ्या कविंनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. कविता 20 ओळींपेक्षा जास्त मोठी नसावी. कविता स्वरचित असावी. एका कविने एकच कविता पाठवावी. कविता निवडण्याचा अंतिम निर्णय निवड समितीचा असेल. कविता पाठविताना कविंनी नाव, पत्ता, फोन क्रमांक, ई-मेल स्पष्ट अक्षरात लिहावा इ. नियम निश्चित करण्यात आले. या नियमांचे पालन करून कविंनी आपल्या कविता ज्ञर्रींळज्ञरीींंर 97रारश्रपशीऽसारळश्र. लेा या आयडीवर किंवा पोस्टाने मराठी वाङ्मय मंडळ नांदेडकर सभागृह, न्यू प्लॉट, अमळनेर जि. जळगाव - 425401 या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.