राज्यातील विविध प्रकल्प, याेजनांसाठी पंधराव्या वित्त आयाेगाने मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी देशातील इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धाेरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययाेजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर याबाबत विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.केंद्राकडून राज्याला पंधराव्या वित्त आयाेगामार्फत मिळणाऱ्या निधीसंदर्भात पवार यांनी मंत्रालयात आढावा घेतला.
बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डाॅ. नितीन करीर, अपर मुख्य सचिव (व्यय) ओमप्रकाश गुप्ता, आराेग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, नियाेजन विभागाचे प्रधान सचिव साैरभ विजय, ग्रामविकास वभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनाेज रानडे, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर आदी यावेळी उपस्थित हाेते. केंद्राचा निधी वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी उपयुक्तता प्रमाणपत्र तत्परतेने आयाेगाला सादर करावे, अशा सूचनाही पवार यांनी दिल्या.
आराेग्य विभागाने पंधराव्या वित्त आयाेगाच्या निधीचा उपयाेग प्रामुख्याने प्राथमिक आराेग्य केंद्रे व उपकेंद्रांच्या उभारणीसाठी करावा. तसेच, नगरविकास आणि मदत व पुनर्वसन विभागाने समन्वयातून नगरपालिकांच्या अग्निसुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण करावे. याद्वारे उपलब्ध निधीचा शंभर टक्के उपयाेग करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.