भारतीय लाेकशाही जगात आदर्शवत : मुख्यमंत्री शिंदे

    22-Dec-2022
Total Views |
 
 

CM 
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गाचे विधानभवनात उद्घाटन विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालताे. आपली लाेकशाही जगात आदर्शवत मानली जाते. देशातील अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा सर्वाे च्च पदापर्यंत पाेहाेचू शकताे, हे आपल्या प्रगल्भ लाेकशाहीचे प्रतीक आहे, तसेच आपल्या लाेकशाहीचे हे खूप सुंदर रूप आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र व लाेकप्रशासन विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत संसदीय कार्यप्रणाली व प्रथा या विषयावर आयाेजित 49व्या संसदीय अभ्यासवर्गाचे विधानभवनात उद्घाटन करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते.
 
या वेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वे कर, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ.नीलम गाेऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार अ‍ॅड. आशिष शेलार, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत व इतर मान्यवर उपस्थित हाेते.संवाद, चर्चा, वादविवाद हे आपल्या लाेकशाहीचे वैशिष्ट्य असले, तरी सर्वांच्या एकत्रित सहभागातून सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय विधिमंडळात हाेतात.भूमिकेवर ठाम राहून सर्व पक्षांचे सदस्य वधिमंडळात जनहितासाठी काम करतात.
 
आपल्या संसदीय लाेकशाहीत सत्ताधारी पक्ष जितका महत्त्वाचा तितकाच विराेधी पक्षही महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळ हे देशातील प्रमुख कायदेमंडळ म्हणून नावाजले जाते, असे अ‍ॅड. नार्वेकर यांनी सांगितले.हा अभ्यासवर्ग म्हणजे एक प्रकारे संसदीय लाेकशाही प्रणालीची प्रयाेगशाळाच आहे.डाॅ. आंबेडकरांनी आपल्या लाेकशाहीची फार सुंदर रचना केली आहे. चेक अँड बॅलन्स पद्धती असलेली आपली लाेकशाही जगातील आदर्श लाेकशाही आहे. कार्यकारी मंडळावर विधिमंडळाचा अंकुश असताे. विधिमंडळ कामकाजात सरकारला विराेधी पक्षासह सत्तारूढ पक्षातील सदस्यही प्रश्न विचारतात. एक प्रकारे आपल्या संविधानाने सरकारला विधिमंडळासाठी उत्तरदायी ठरवले आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.