शास्त्रीय संगीत देते मानसिक शांतता आणि आनंदसुद्धा

    17-Sep-2021
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

music_1  H x W: 
आयुर्वेद, याेगासारख्या अनमाेल देणग्या भारताने जगाला दिल्या आणि त्यात शास्त्रीय संगीतसुद्धा आहे. शास्त्रीय संगीत समजण्यास अवघड वाटले, तरी ते ऐकताना मानसिक शांतता मिळते, मानसिक तणाव दूर हाेताे, असे ते ऐकणाऱ्यांचा अनुभव आहे. याचा उगम वैदिक काळात झाल्याचे मानले जाते.विविध राग हे शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य. दिवसातील काेणत्या वेळी काेणते राग म्हणावेत हेही ठरलेले आहे. शास्त्रीय संगीत ऐकणे म्हणजे महासागराची भव्यता व खाेली जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे असते आणि राग हा त्याचा पाया आहे. गायन करताना त्यात जेवढे खाेल जाल तेवढे पुढे अजून काही असल्याची जाणीव गायकाला हाेत राहणे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. राग आळवताना, त्याचा विस्तार करताना मिळणारे समाधान शब्दांत सांगता येणारे नाही.
 
ध्रुपद, धमार, ख्याल, टप्पा, ठुमरी आणि गझल हे राग-संगीतातील भिन्न प्रकार विविध राजवटींच्या काळात गरजेनुसार विकसित झाले. जुन्या हिंदी चित्रपटांतील गाणी प्रामुख्याने रागांवर आधरित असत. सी. रामचंद्र, नाैशाद, एस. डी. बर्मन, अनिल विश्वास, जयदेव, राेशन आणि कल्याणजी-आनंदजी यांच्यासारख्या महान संगीतकारांना राग आणि ताल यांची उत्तम जाण असल्यामुळे त्यांनी त्यातून अत्यंत सुरेल गाणी तयार केली. ‘चंदन सा बदन’, ‘खिलते हे गुल यहाँ’, ‘प्यार किया ताे डरनाक्या’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘हमें तुमसे प्यार कितना’ आणि ‘प्रभू तेराे नाम’ यासारखी आजही लक्षात असलेली गाणी हे त्याचे उदाहरण आहे. राग-संगीतात प्रत्येकाला आवडणारे, समजणारे काही तरी असल्यामुळे संगीताचे अभ्यासक असाेत, विद्यार्थी असाेत किंवा सामान्य श्राेता; काेणीही या संगीताचा आनंद घेऊ शकतात. प्राचीन ऋषींनी रागांची रचना केल्याचे मानतात.
 
त्यांचा हेतू हाेता शांतता मिळविण्याचा, समाधानी राहण्याचा. रागांचा संबंध निसर्गाबराेबर असल्यामुळे आपल्याला समाधान लाभते. रागाच्या मूळ चाैकटीत राहून त्याचा विस्तार गायक त्याच्या क्षमतेनुसार करू शकताे. त्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकल्यावर आनंदच मिळताे.संगीतकार आणि सतारवादक तुषार भाटिया म्हणतात, ‘संगीताचे दाेन भाग असतात. पहिला म्हणजे वैयक्तिक. यात गायक किंवा गायिका त्यांच्या कल्पनेप्रमाणे राग खुलवतात. दुसरा भाग म्हणजे वाद्यवादकाबराेबर समन्वय साधून ताल सांभाळणे. यातून तुम्ही राग आणि ताल या दाेन्ही गाेष्टींचे संतुलन साधायला शिकता.’ मुंबईतील ‘संगीत महाभारती’ या संस्थेचे संचालक आणि तबला, तसेच सतारवादक नयन घाेष यांच्या मते, सुजाण माणूस हाेण्यासाठी संगीताचे शिक्षणआणि ज्ञानाचा उपयाेग हाेताे. आपली भावनिक आणि आध्यात्मिक क्षमता वाढून ताणतणावांबराेबर सामना करण्याची क्षमताही वाढते.
 
केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे, तर शास्त्रीय नृत्यालाही ते लागू पडत असल्याचे कथ्थक नृत्याचे जाणकार वैभव जाेशी यांनी नमूद केले. भारतात ‘संगीत’ हा शब्द गायन, वादन आणि नृत्याबराेबर संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘काेणतीही कला तुम्ही शिकता तेव्हा तुम्ही शिस्त, समर्पण, भक्ती आणि निर्धारही शिकता. या कलांच्या राेजच्या सरावामुळे तुमची सहनशीलता आणि एकाग्रतेची क्षमताही वाढते. नृत्यामुळे चांगला व्यायाम हाेऊन शारीरिक तंदुरुस्ती वाढते आणि नकारात्मक विचार जाऊन तुम्ही आनंदी राहायला शिकता.’ मुंबईत लाइफ काेच आणि समुपदेशकाचे काम करणारे डाॅ. पुनीत पटेल यांचे मतही वैभव जाेशी यांच्याप्रमाणे आहे. ते म्हणतात, की शास्त्रीय संगीत नुसते ऐकले तरी मानसिक शांतता लाभते, श्राेत्याला खाेलवर समधान मिळते. मन आणि हृदयाच्या आराेग्यासाठी शास्त्रीय संगीत हे फार चांगले औषध आहे.
 
स्वत: पटेल हे अमेरिकेत लहानाचे माेठे झाले; पण भारतीय संगीताचे मर्म समजून घेण्यासाठी ते येथे आले. या विषयावर त्यांनी डाॅ्नटरेटही केली. भारतात ते एवढे रमले, की पुन्हा अमेरिकेला गेले नाहीत. त्यांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचा वापर सुरू केल्यामुळे नेहमी दाेन तास चालणाऱ्या सेशनची वेळ 45 मिनिटांवर आल्याचे ते सांगतात. ‘रुग्णाची स्थिती आणि लक्षणे पाहून मी शास्त्रीय संगीत निवडताे. हे संगीत ऐकताना रुग्ण माेकळे हाेतात, त्यांचा तणाव कमी हाेताे आणि ते चांगला प्रतिसाद देतात. त्यांची समस्या समजल्यावर उपचार करणे कठीण नसते. आता मी रुग्णांना 15 मिनिटे संगीत ऐकविताे आणि अर्धा तास त्यांच्याबराेबर बाेलताे. केवळ 45 मिनिटांत माझे काम हाेते,’ अशी माहिती त्यांनी दिली.