काैरवांची राजधानी हस्तिनापूर शाेधण्याचे काम पुन्हा सुरू

    09-Aug-2021
Total Views |
 
 

hastinapur_1  H 
 
भाऊबंदकी महाभारत काळापासून प्रचलित आहे. 100 काैरवांची राजधानी हस्तिनापूर दिल्ली-हापुड राेडवर हाेती, असा पुरातत्व खात्याचा अंदाज हाेता. आजही मेरठपासून 40 कि.मी. दूर हस्तिनापूर नावाचे गाव आहे. हे गाव खराेखरच काैरवांची राजधानी हस्तिनापूर आहे का? हे शाेधण्यासाठी पुरातत्व विभाग सप्टेंबर 2021 पासून उत्खनन करणार आहे.70 वर्षांपूर्वी या परिसरात उत्खनन करण्यात आले हाेते व हस्तिनापूर नक्की काेठे हाेते, हे प्रथमच 1952 मध्ये शाेधण्यात आले हाेते. अशी माहिती प्राे. बी.बी. लाल यांनी दिली. त्यांच्या मते महाभारत काळ इ. स.पूर्व 900 सालचा आसपासचा असावा. याच काळात गंगा नदीला महापूर आला व त्यात हस्तिनापूर वाहून गेले व त्या जागी आजचे हस्तिनापूर आहे. या गावाच्या आसपास केलेल्या उत्खननात काही पुरावे सापडले हाेते.
 
सिनाैली या गावात उत्खनन केल्यानंतर दफनभूमी आणि स्मशानभूमी आढळून आली हाेती व एक कांस्य अश्वरथ सापडला हाेता.
1952 नंतर उत्खनन थांबविण्यात आले हाेते, ते आता सप्टेंबर 2021 मध्ये पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यानंतर पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ शाेधण्यात येणार आहे.महाभारत युद्ध हाेण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी शिष्टाई करून पाच पांडवांना 5 गावे तरी द्या, असा सल्ला काैरवांना दिला हाेता. पण दुर्याेधनाने मी पांडवांना सुईच्या टाेकावर राहील इतकीही जमीन देणार नाही, अशी वल्गना केली हाेती. शेवटी महायुद्ध झाले व 5 पांडवांनी 100 काैरवांचा पराजय केला.पण हस्तिनापूर ऐवजी नवी इंद्रप्रस्थ राजधानी वसविली हाेती.