दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची नारायण राणेंकडून पाहणी

27 Jul 2021 14:37:04
 
पंतप्रधान आवास याेजनेतून घरे बांधून देणार
 

flood_1  H x W: 
 
 
रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड काेसळून तेथील कुटुंबे मातीखाली गाडली गेली. येथील सुमारे 42 कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास याेजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत, अशी घाेषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.राणे काेकण दाैऱ्यावर आले असून, त्यांनी महाडजवळील तळीये गावातील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी विधानसभेतील विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी उपस्थित हाेते.दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात येईल.राज्य व केंद्र सरकार या ठिकाणी पुन्हा चांगल्या प्रकारे वसाहत बांधेल, अशी ग्वाही राणे यांनी दिली.अशा घटना घडल्यानंतर दुर्घटनाग्रस्तांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत दिली जात आहे.
 
त्या पलीकडे मदत हाेणार नाही, असे नाही. दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास याेजनेत पक्की घरे देण्याची याेजना आहे. तसेच, एकच गाेष्ट आम्हाला परत आणता येणार नाही ते म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना; पण जे हयात आहेत त्यांना मात्र आम्ही दिलासा देऊ शकताे, याची आम्हाला खात्री आहे, असे सांगत राणे यांनी दुर्घटनाग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला.स्थानिकांना मदत मिळावी, यासाठी अधिकारी, एनडीआरएफची पथके चांगले काम करत आहेत. आपले गावातच कायमे पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि स्थानिक नागरिक सुचवतील तेथे त्यांचे कायमचे पुनर्वसन हाेईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0