बारावीचा अर्ज भरण्यास आदल्या दिवसापर्यंत मुभा

    01-May-2021
Total Views |
 

Exams_1  H x W: 
 
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेसाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू हाेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यासाठी मंडळाने नमूद केलेल्या शुल्कानुसार विद्यार्थ्यांना विभागीय मंडळामार्फत कार्यवाही करता येईल. राज्य मंडळाचे सचिव डाॅ. अशाेक भाेसले यांनी ही माहिती दिली. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाने 23 एप्रिलपासून सुरू हाेणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यानुसार विभागीय मंडळांनी 22 एप्रिलपर्यंत प्राप्त झालेल्या परीक्षा अर्जांवर कार्यवाही करायची आहे. दरवर्षी राज्य मंडळाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू हाेण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत अर्ज भरण्याची संधी दिली जाते. यंदाही ही संधी देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नमूद केलेल्या विलंब शुल्कानुसार अर्ज भरता येईल.