गेलेली वेळ परत फिरून येत नाही. म्हणून मी चेतनेला चेतवताे आहे की, ‘आता तरी जागी हाे !’ मातीच्या कच्च्या मडक्यात पाणी जास्त काळ थांबून राहत नाही. हे शरीरही एक कच्चं मडकंच आहे.मृत्यूचा जरासा धक्का लागला की, सर्व काही संपले ...! त्यामुळे, या शरीराचा अभिमान बाळगणे व्यर्थ आहे. हे शरीर केवळ धर्माची साधना करण्याचे माध्यम आहे. म्हणून या शरीराचा कसलाही माेह टाळावा. सत्कृत्ये करवीत. यामुळेच जीवनाचे सार्थक हाेईल, यात संशय नाही.