महाराष्ट्राला 40 टक्के पुरस्कार ही अभिमानास्पद बाब : शिंदे

24 Nov 2021 16:57:11
 
 

award_1  H x W: 
 
स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये महाराष्ट्राने देशात सर्वाेत्तम कामगिरी केली असून, दिल्लीत झालेल्या पुरस्कार प्रदान साेहळ्यात विटा, लाेणावळा आणि सासवडने देशात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवणाऱ्या या नगरपालिकांचे आणि विविध मानांकनांत पुरस्कार पटकावणाऱ्या शहरांचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत स्वच्छता, शहराचा हागणदारीमुक्तीचा दर्जा, घनकचरा व्यवस्थापन, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज, आदी घटकांचे केंद्राच्या त्रयस्थ संस्थेमार्फत व्यापक सर्वेक्षण केले जाते.
 
या सर्वेक्षणात राज्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्यामुळे, स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राने सर्वाेत्तम कामगिरी केली, त्याबद्दल राज्यातील नागरिकांचे आणि पुरस्कारप्राप्त नगरपालिकांचे शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.नवी दिल्लीमध्ये प्रदान झालेल्या पुरस्कारांमध्ये एकूण पुरस्कारांच्या 40 टक्के पुरस्कार हे महाराष्ट्राला आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब असून, वन स्टार मानांकनांत 147 पैकी 55 शहरे, तर थ्री स्टार मानांकनांमध्ये 143 पैकी 64 शहरे आणि फाईव्ह स्टार मानांकनांत देशातील 9 शहरांत नवी मुंबई महापालिकेचा समावेश झाला आहे, ही राज्याच्या दृष्टीने गाैरवाची गाेष्ट आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0