दुबई वर्ल्ड एक्स्पाेत 15 हजार काेटींचे करार

22 Nov 2021 16:07:35
 
 

dubai_1  H x W: 
 
दुबईतील वर्ल्ड एक्स्पाेत झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खाेवला गेला आहे. या परिषदेत 25 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून, 15260 काेटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. या माध्यमातून दहा हजारांपेक्षा अधिक प्रत्यक्ष राेजगार उपलब्ध हाेणार आहे.उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारात जपान, सिंगापूर, स्वीडन, द. काेरिया, जर्मनी, इटलीतील कंपन्यांनी वाहन व वाहनघटक, लाॅजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्स्टाईल, डेटा सेंटर, औषधनिर्माण, जैवइंधन व तेल आणि वायू आदी विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे.
 
यासह आर्थिक आणि औद्याेगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकाॅनाॅमिक फाउंडेशनसाेबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.याप्रसंगी अपर मुख्य सचिव (उद्याेग) बलदेव सिंग, आयुक्त (उद्याेग), हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.पी. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एस.आर. रंगा नाईक व महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घाेरपडे उपस्थित हाेते.दुबईतील वर्ल्ड एक्स्पाेत 190 देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील उद्याेजक, गुंतवणूकदार, शासकीय विभाग सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0