पुणे, 21 जानेवारी (आ.प्र.) : राज्यासह संपूर्ण देश काेराेनामुक्त हाेवाे...आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण हाेवाे आणि अयाेध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे हाेवाे, असे मागणे राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी दगडूशेठ गणपतीसमाेर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना राज्यपालांनी सुजलाम् सुफलाम् देशासाठीही प्रार्थना केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे राज्यपालांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार गिरीश बापट, ट्रस्टचे अध्यक्ष अशाेक गाेडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित हाेते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर राज्यपालांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.लाेकमान्य टिळकांनी गणेशाेत्सवाच्या माध्यमातून जी सुंदर परंपरा सुरू केली आहे, ती पुढील अनेक युगे ती सुरू राहील, असे सांगत त्यांनी गणपती बाप्पा माेरयाचा जयघाेष केला.