राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून हाेणार सुरू : शिक्षणमंत्री

18 Jan 2021 12:46:03

vfg_1  H x W: 0 
 
मुंबई, 17 जानेवारी (आ.प्र.) : राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले असून, आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू हाेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी येथे एका कार्यक्रमात दिली.राज्यात काेराेनामुळे गेल्या वर्षी मार्चपासून शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली हाेती. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राज्यभरात ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. राज्यभरात नुकतेच नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता माध्यमिक शाळा कधी सुरू हाेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते.पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करण्यात येतील, असे जाहीर करत प्रा. गायकवाड यांनी सर्व पालकांना दिलासा दिला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षकांची काेराेनाबाबत काळजी घेण्यात यावी व सर्व नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0