मेट्राे पाचचा विस्तार उल्हासनगरपर्यंत हाेणार असल्याचे स्पष्ट

    23-Sep-2020
Total Views |
डीएमआरसीचे नियाेजन : लवकरच सुरू करणार भाैगाेलिक सर्वेक्षण

Zethyjrsutk_1   
 
ठाणे, 22 सप्टेंबर (आ.प्र.) : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्राे पाचच्या मंजूर मार्गात बदल करण्याच्या हालचाली एमएमआरडीएकडून सुरू असताना आता हा मार्ग उल्हासनगरपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न दिल्ली मेट्राे रेल काॅर्पाेरेशनने (डीएमआरसी) सुरू केले आहेत. या कामासाठी भाैगाेलिक सर्वेक्षण येत्या काही दिवसांत सुरू हाेईल.ठाणे-कल्याण-भिवंडी या 24.9 कि.मी.च्या मेट्राे प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. ते ऑक्टाेबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन आहे.या कामासाठी 8416 काेटी खर्च अपेक्षित आहे.या मार्गावरून राेज सुमारे तीन लाख प्रवासी प्रवास करतील. प्रकल्पाचा वित्तीय अंतर्गत परतावा दर मालमत्ता विकासासह (एफआयआयआर) 6.02 टक्के इतका असेल, तर आर्थिक अंतर्गत परतावा (ईआयआरआर) 17.09 टक्के असेल, असे सांगितले जाते.या मार्गिकेच्या ठाणे-भिवंडी मार्गावरील कामास सुरुवात झाली आहे. एमएमआरडीएकडून मार्ग बदलांच्या हालचाली सुरू असताना या मार्गाच्या विस्ताराचे नियाेजन डीएमआरसीकडून केले जात आहे.राजीव गांधी चाैक ते टेमघर आणि दुर्गाडी चाैक ते उल्हासनगर असा 15 कि.मी. विस्तार करण्याचे नियाेजन आहे. या सेवेमुळे नागरिकांना निश्चितच फायदा हाेईल.मेट्राे पाचचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याची घाेषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांत केली हाेती.डीएमआरसीने सर्वेक्षणाच्या कामासाठी निविदा काढून त्याला मूर्त रूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
भाैगाेलिक सर्वेक्षणात या मार्गिकेची सुसाध्यता स्पष्ट झाल्यानंतर त्याची व्यवहार्यता तपासणी हाेईल आणि त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.