लाॅकडाऊनमुळे अनेक सकारात्मक गाेष्टींची जाणीव झाली. आपण आयुष्यभर अनेक गाेष्टी गरज नसतानाही जमवत असताे.
त्याची काहीही गरज नसते हे समजले.शेतकरी राजाचे महत्त्व सगळ्या जगाला कळले. जगाचा पाेशिंदा बळीराजाच आहे, हे सिद्ध झाले. जगायला सुरक्षित ठिकाण, खायला पाेट भरण्यापुरतं अन्न आणि मायेची माणसं लगतात. पैसे शिजवून खाता येत नाही हे कळालं. याशिवाय बऱ्याच गाेष्टींचं महत्त्व नव्याने पटलं. लाेकांचा गर्व कमी झाला.पैशापेक्षा माणसांची किंमत वाढली.
धन, संपत्तीपेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे हे कळले. बाहेरचं खाणं बंद हाेऊन सर्वचजण घरचं जेवण करू लागले.
मुलांना घरातल्या चवीची आणि जेवणाची किंमत कळू लागली गृहिणींना घरात किती कामं असतात, हे पुरुषांना कळू लागले.
निसर्गाला सर्व समानच आहेत, श्रीमंत, गरीब असा भेदभाव नाही.सर्वांना शेतकऱ्यांची किंमत समजली. कारण आज लाॅकडाऊनमुळे सर्व काही बंद आहे फ्नत जीवनावश्यक गाेष्टी भाजीपाला, दूध, धान्य या गाेष्टी मिळत आहेत. नेहमी दारू पिणारे, दारूशिवायही राहू लागले आहेत, न पिताही जगू शकतात हे त्यांना कळाले असणार. कमीत कमी सामग्रीमध्ये हाॅटेलपेक्षाही आई छान छान डिश तयार करते हे घरातील लाेकांना समजले. आईला किंवा पत्नीला तू नुसती घरातच असते, हे वा्नय आता काेणीच बाेलू शकत नाही.
कमीत कमी वस्तू वापरून जीवन छान जगता येते, प्रत्येक गाेष्टीला ब्रँड पाहिजेच, ही मानसिकता आता कमी हाेत आहे. आहे त्यातसुद्धा भागवू शकताे.माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत, हा गैरसमज आहे व ते निसर्गाने उत्तमरीत्या समजावून सांगितले आहे.