महाराष्ट्राला ई-पंचायतराज पुरस्कार

    18-Sep-2020
Total Views |
केंद्राकडून राज्याचा गाैरव : मुश्रीफ यांनी स्वीकारला पुरस्कार

dzxhbrcyjny_1   
 
मुंबई, 17 सप्टेंबर (आ.प्र.) : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई- पंचायत क्षेत्रात महाराष्ट्राने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून, यावर्षीही ही उज्ज्वल परंपरा सुरू ठेवली आहे. याची पाेचपावती म्हणून केंद्राने ई-पंचायत पुरस्कार- 2020 चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्राचा गाैरव केला आहे.राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, उपसचिव प्रवीण जैन, कक्ष अधिकारी नितीन पवार यावेळी उपस्थित हाेते.ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील 3 राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येताे.घटनेतील 73 व्या घटनादुरुस्तीनंतर कलम 243 नुसार पंचायत राज संस्थांना महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आले असून, केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांश विकास याेजना या पंचायत राज संस्थांमार्फत राबवण्यात येतात. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करून त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पीआरआय (श-झठख) हा उद्देश मार्ग प्रकल्प (चळीीळेप चेवश झीेक्षशलीं) 2011 पासून हाती घेतला आहे.केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारात ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत सेवा-दाखले त्यांच्या रहिवासी क्षेत्रात कालबद्ध स्वरूपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त बँकिंग सेवा ग्रामीण भागात एकाच केंद्रावर मिळाव्यात या हेतूने राज्यातील ग्रामपंचायतींत सीएसई या केंद्राच्या कंपनीच्या सहकार्याने ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन करण्यात आली आहेत.