हे दृश्य बांगलादेशाची राजधानी ढाका येथील 'सदरघाट फेरी पोट'चे आहे. बकरी ईदनिमित्त घरी जाण्यासाठी लोकांनी पोटवर प्रचंड गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याचे कारण असे की, बांगलादेश सरकारने ट्रेन व बस प्रवासावर कडक निर्बंध घातले आहेत. फक्त ५०% लोकांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना बोटीने प्रवास करण्याशिवाय पर्यायच नाही. बांगलादेश सरकारने १६ ते ३१ जुलै असे १५ दिवस कडक लॉकडाऊन लागू केला होता, पण लोकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले.