बारावीचा निकाल येत्या आठवड्यात, तर दहावीचा ३१ जुलैपर्यंत लागणार

Sandyanand    12-Jul-2020
Total Views |
 
rt_1  H x W: 0
 
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत, तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. qहगोली दौऱ्यावर आलेल्या गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. दहावी, बारावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत.
 
निकालाला विलंब झाल्याने आता पुढील प्रवेशालाही उशीर होणार आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा निकाल एकत्रित जाहीर केला जातो. यांपैकी मुंबई, ठाणे व पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा फैलाव सुरू झाला तेव्हा बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती, तर दहावीचा भूगोलचा पेपर रद्द झाला. या पेपरचे गुण सरासरी पद्धतीने दिले जाणार आहेत. शासनाने शाळा, महाविद्यालयांना अद्याप परवानगी दिलेली नाही. बारावीचे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी गुणपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी विद्याथ्र्यांना महाविद्यालयात जावे लागते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.