महाराष्ट्राची ओळख सक्षम राज्य म्हणून होईल

31 May 2020 12:28:05
 


सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभर हाहाकार माजला आहे. कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार थांबवण्यासाठी जवळपास सर्वच देशांत लॉकडाऊन स्थिती आहे. सर्व व्यापार उद्योग बंद आहेत. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. 


'वर्क फ्रॉम होम' कार्यपध्दतीमुळे सर्व कंपन्यांचा खर्च कमी होऊन शेवटी नफा वाढेल. महाराष्ट्रात कॉम्प्युटरचे ज्ञान आणि कौशल्य असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा कंपन्या महाराष्ट्रभर सुरू होतील. 


अमेरिका, इटली, स्पेन यासारख्या देशांची अवस्था बिकट झाली आहे. परंतु, आपल्या देशात कोरोना थोडा उशिरा आल्याने आपणावर इतरांपेक्षा कमी प्रभाव आहे. त्यातही महाराष्ट्र या कोरोनाच्या कठीण परिस्थितीचा सामना अत्यंत चांगल्या प्रकारे करत आहे. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रावर भविष्यात काही सकारात्मक परिणाम घडतील. येत्या काळात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र एक सक्षम राज्य म्हणून ओळखला जाईल. याची काही कारणे आहेत. 

- प्रकाश भोसले
Powered By Sangraha 9.0