उन्हाळ्यात नाकातील रक्तस्रावापासून बचाव कसा कराल?

04 Apr 2020 12:24:35
 

 


कापूस टाकल्यानंतर नाक दाबून धरा. १०-१५ मिनिटे नाक दाबल्यानंतर नाकातून होणारा रक्तस्राव जवळजवळ बंद होईल. 


उन्हाळ्यात नाकातील रक्तस्राव होण्याच्या समस्येला अनेकांना सामोरे जावे लागते. यापासून बचाव करण्यासाठी सल्ला पुढे दिला आहे. उन्हाळ्यात अनेक लोक नाकातून रक्तस्राव होण्याच्या समस्येने त्रस्त होतात. समस्येचे मूळ गरम कोरडी हवा असते. ज्यामध्ये ओलाव्याचा अंशही तापत्या सूर्यामुळे कमीतकमी होतो. त्यामुळे नाक कोरडे पडून त्यात खपली धरते.


ती काढण्याच्या प्रयत्नात नाकाच्या आतील बाजू सोलली जाते. त्यामुळे त्यातील रक्तवाहिन्या जखमी होतात. आणि त्यातूनच रक्त वाहू लागते. चेहऱ्याच्या सर्व बाजूंमध्ये रक्ताचा प्रवाह भरपूर असतो, त्यामुळे नाकातून रक्त बाहेर पडू लागते. त्यामुळे मन भीतीने भरून जाते; पण तथ्य असे आहे की, ज्येष्ठ-वृद्ध व्यक्तींच्या नाकात बोटे न घालण्याच्या शिकवणुकीला मानण्याने आणि काही लहानलहान कृती केल्याने नेहमी नेहमी होणाऱ्या नाकातील रक्तस्रावापासून सुटका मिळू शकते. नाकातून रक्त वाहू लागले तर घाबरू नका, तर धैर्य राखून ठेवा. रक्त थांबण्यासाठी पुढच्या बाजूला डोके झुकवून आरामात बसा.


आपल्या बोटांनी नाकाच्या मुलायम भागाला १०-१५ मि निटे दाबून ठेवा. त्यामुळे रक्त येणे बंद होईल. पण लक्षात घ्या की, रक्तस्राव थांबल्यानंतर शिंकरू नका. नाहीतर रक्त वाहणे पुन्हा सुरू होईल. जर नाक दाबल्यानंतरही रक्त वाहणे बंद झाले नाही तर, कोणा डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचे साहाय्य मिळाले नाही तर घरगुती उपचार करा. दोन्ही नाकपुड्यांमध्ये वॅक्सीन लावलेला कापूस ठेवा. कापसाचे एक टोक नाकाच्याबाहेर ठेवा. ज्यामुळे तो सुलभतेने बाहेर काढता येईल.


कापूस टाकल्यानंतर नाक दाबून धरा. १०-१५ मिनिटे नाक दाबल्यानंतर नाकातून होणारा रक्तस्राव जवळजवळ बंद होईल. हा कापूस किंवा नेजल पॅक नाकातील रक्तस्राव बंद झाल्यानंतर २४-४८ तास नाकातच ठेवला जातो. त्याचा परिणाम म्हणून जखमी रक्तवाहिन्यांवर दबाव येतो आणि त्यांना झालेली जखम भरून येते. नंतर पूर्ण सावधगिरी बाळगून त्या कापसाला काढून टाका.
Powered By Sangraha 9.0