आदरणीय महात्मा गांधी यांचा गुजरातमधील साबरमती आश्रम तुम्हाला माहिती असेल. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात त्यांचा एक आश्रम आहे आणि ताे म्हणजे ‘सेवाग्राम आश्रम’ हा बापूजींच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वपूर्ण आश्रम हाेता. कारण त्यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यातील अतिशय महत्वाचा असा 12 वर्षांचा काळ येथे घालवला.आजही हा आश्रम बापूजींच्या शिकवणीनुसार चालताे.300 एकर जमिनीवर हा आश्रम वसलेला आहे.सेवाग्राममध्ये अनेक प्रकारच्या झाेपड्या आहेत. त्यात स्वत: गांधी व त्यांचे सहकारी वास्तव्य करीत हाेते. त्यात गांधींची त्या काळातील जीवनशैली दिसून येते. तेथे असणारी बापू कुटी आणि बा कुटी प्रसिद्ध आहेत. सेवाग्रामचे पहिले नाव सेगाव हाेते, पण महात्मा गांधींनी ते बदलून सेवाग्राम असे केले. 1930 मध्ये ‘मिठाचा सत्याग्रह’ करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या सहकाऱ्यांसाेबत गांधींनी ‘दांडी यात्रा’ काढली हाेती.स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांचा संकल्प हाेता. या सत्याग्रहानंतर ब्रिटिशांनी त्यांना अटक करून पुण्याच्या येरवडा येथील तुरुंगात ठेवले.1933 मध्ये तुरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजींनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली.ताेपर्यंत स्वातंत्र्य न मिळाल्याने गांधीजी साबरमती आश्रमामध्ये परतले नाहीत. 1934 मध्ये जमनालाल बजाज तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे गांधींनी वास्तव्य केले. त्यांनतर दाेन वर्षांनी 1936 मध्ये गांधीजी पहिल्यांदा मगनवाडीहून सेगाव (सेवाग्राम) येथे आले व तेथेच त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला. गांधीजी आणि कस्तुरबा यांच्यासाठी आश्रमामध्ये छाेटे घर बांधले व जातिभेद माेडण्यासाठी हरिजन समाजातील महिलांना स्वयंपाकासाठी ठेवले. गांधीजीनी सेवाग्राममध्ये असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.