मनाेरला खारे पाणी गाेडे करण्याचा प्रकल्प उभारणार

25 Nov 2020 12:47:08
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश - मुंबईतील पाणीकपात टाळण्यास उपयुक्त 
 
 
5hy_1  H x W: 0
 
मुंबई, 24 नाेव्हेंबर (आ.प्र.) : मुंबईत मे व जूनमधील पाणीकपात टाळण्यासाठी मनाेरमध्ये समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गाेडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.हा प्रकल्प उभारणीबाबत वर्षावर आयाेजित आढावा बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापाैर किशाेरी पेडणेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजाेय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आदी यावेळी उपस्थित हाेते.पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जूनमध्ये मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गाेडे केल्यास मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास कमी हाेण्यास मदत हाेईल. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरू ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.साैरऊर्जेवर हा प्रकल्प राबवल्यास निर्मिती खर्चही कमी लागेल. मनाेरमध्ये पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध हाेऊ शकतात.तेथे नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विनाव्यत्यय पूर्ण हाेऊन मुंबईच्या नागरिकांना नियमित पाणीपुरवठा हाेईल, असेही त्यांनी सांगितले.मनाेरमध्ये 25 ते 30 एकरात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढवण्यासाठी साेयीस्कर आहे.हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे आयुक्त चहल यांनी सादरीकरणात सांगितले.
Powered By Sangraha 9.0