प्रवरा नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गाेदावरीला जाऊन मिळते. या नदीवर भंडारदरा धरण आहे. या नदीला अमृतवाहिनी असेही म्हटले जाते. प्रवरा नदीचा उगम कसा झाला व या नदीला अमृतवाहिनी का म्हणतात, यामागे पुराणकाळातील एक कथा आहे.पूर्वी देव व दैत्य यांनी समुद्रमंथन करून अमृत व इतर रत्ने काढायचे ठरवले.त्यांनी मंदराचल पर्वताची रवी व वासुकी सर्पाचा दाेर केला व मंथन सुरू केले. देव हे शेपटीच्या बाजूने व राक्षस मुखाच्या बाजूने ओढत हाेते. मुखातून बाहेर पडलेल्या विषाच्या उष्णतेचा सर्वांना त्रास हाेऊ लागला. तेव्हा महादेवांनी ते विष प्राशन केले. पुढे समुद्रमंथनातून लक्ष्मी, काैस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, रंभा, ऐरावत, अमृत, विष, उच्चै:श्रवा नावाचा घाेडा, कामधेनू, शंख, व हरिधेनू अशी चाैदा रत्ने निघाली.समुद्रमंथनाच्यावेळी मंदराचल पर्वत खाली जाऊ लागला. तेव्हा विष्णूंनी कूर्मरूप धारण करून ताे वर उचलला. चाैदा रत्नांची वाटणी हाेत असताना अमृत व सुरा याबद्दल वाद सुरू झाला. या वादाचा निकाल करताना विष्णू म्हणाले, देवांनी एका पंक्तीला व दैत्यांनी एका पंक्तीला बसावे. एक स्त्री येऊन अमृत व सुरा पंक्तीत वाढेल.ज्याला जे मिळेल ते त्याने घ्यावे. मग विष्णूंनी माेहिनी रूप घेऊन वाटप सुरू केले.माेहिनीच्या रूपाने असूर वेडे झाले असताना विष्णूंनी देवांना अमृत व दैत्यांना मदिरा वाढली.त्यावेळी राहू कपटाने देवाच्या पंक्तीत बसून अमृत प्यायला. हे पाहताच चंद्राने विष्णूला खूण करून कळवले. विष्णूने सुदर्शन चक्र साेडून त्याचा शिरच्छेद केला.त्याचे शीर आकाशात उडाले. तर धड पश्चिम समुद्राकडे पळू लागले. हे पाहून देव त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करू लागले. शंकराने आपला त्रिशूळ त्याच्या पाेटात खुपसला. परंतु त्याच्या पाेटातील अमृतामुळे त्याचा धडाचा नाश हाेत नव्हता. तेव्हा शंकरांनी म्हाळसा नावाच्या डाेंगरावर राहूच्या घशात अंगठा घालून पाेटातील अमृत काढण्याचा प्रयत्न केला. पण राहूच्या पाेटातील अमृतामुळे तेच अमृत जाऊन समुद्राला मिळाले. त्या ओघाला प्रवरा नदी असे म्हणतात. ही नदी गाेदावरीला मिळून पुढे सागराला मिळाली. प्रवरा व गाेदावरीच्या संगमावरून राहूच्या धडावर माेहिनी बसलेली आहे. तिला म्हाळसा म्हणतात.