नवे मित्र जरूर बनवा; पण जुन्या मित्रांची साेबत साेडू नका. नवे मित्र चांदीप्रमाणे असतील, तर जुने साेन्याप्रमाणे आहेत, हे विसरू नका.जे मित्र तुम्हांला वाममार्गाला लावतात, ते मित्र कमी, शत्रूच जास्त आहेत.मित्र ओळखायला शिका.त्यांच्या भावना दुखवू नका. ज्या व्यक्ती आपल्या लहान-सहान चुकांना क्षमा करू शकत नाहीत, त्या मित्र म्हणून राहू शकत नाहीत. संकटसमयी, सावलीप्रमाणे त्यांच्यासाेबत राहावे. कारण, मित्राकडून कधीही म्हटले जाऊ नये. ‘दाेस्त दाेस्त ना रहा ... !