कमी देखभालीची गरज याचे नाव कैक्टसफ्रेंडशिप यासाठी ठेवले गेले आहे कारण ज्याप्रकारे कॅ्नटसचे राेप अत्यंत कमी पाण्यात व देखभालीतही टवटवीत राहते. त्याप्रमाणेच या मैत्रीत मित्रांना एकमेकाशी जाेडून राहण्यासाठी राेज बाेलण्याची गरज नसते. मैत्रीचे हे नाते काेणत्याही दबावाविना सतत चालत राहते. कैक्टसफ्रेंडशिप वेळ व दुराच्या कसाेटीवर पूर्णपणे खरी ठरते. जर आपली मैत्रीण दुसऱ्या शह वा देशात असेल तर हे अंतर नाते कमकुवत नव्हे तर मजबूत बनवील.भावनिक आत्मीयतेची झलक या मैत्रीत जरी मित्र भाैतिक रुपाने दूर असले वा कमी भेटत असले तरी त्यांच्यात भावनिक नाते अत्यंत खाेल असते. कित्येक महिने न बाेलताही जेव्हा आपण पुन्हा बाेलता तेव्हा असे वाटते की जणू कसलाही दुरावा आलेलाच नाही. परस्पर संभाषणात आत्मीयता स्पष्ट झळकते. तेच दीर्घकाळानंतर भेटल्यामुळे आनंद सर्वांत जास्त हाेताे.
कठीण काळात मजबूत आधार जेव्हा मित्रावर माेठे संकट येते तेव्हा सर्वप्रथम उभे राहणारे हेच ‘कैक्टसमित्र’ असतात. हे काेणताही दिखावा न करता आपली ढाल बनून साेबत उभे राहतात. या नात्यात विश्वास एवढा पक्का असतेकी, ही जाणीव कायम टिकून राहते की आपसात भले कितीही संकटे आली तरी ही मैत्री नेहमी टिकून राहील व साथ देईलमानसिक आराेग्यासाठी उत्तम ही मैत्री काेणत्याही हाय मेटेनेंस वा इमाेशनल डिमांडविना असते. याचा अर्थ आहे की नाते व्यवस्थित चाालण्यासाठी व आनंदी राखण्यासाठी खूप जास्त वेळ, पैसा, लक्ष व देखभालीची गरज नसते. यामुळे आपली मानसिक शांती नेहमी टिकून राहते.मैत्रीचा आधार स्वार्थ नव्हे तर प्रेम आता मैत्रीसाठी भेट हाेण्याची गरज संपली आहे. मैत्रिणीसाेबत मानसिक ताळमेळ असणे तिच्यासाेबत वेळ घालवण्याच्या तुलनेत जास्त महत्त्वाचे आहे. जर आपले संबंध स्वार्थाने प्रदूषित नसतील तर त्यात कधीच कटुता येऊ शकत नाही. जर संबंध हार्दिक असतील तर आपण कितीही दिवसांनंतर भेटला तरी असे वाटेल की जणे आपण कालच भेटला आहात.