प्रत्ययें करी श्रवण । मननशील अंत:कर्ण । ताेचि नर नारायेण ।।1।।

    12-May-2026
Total Views |
 

saint 
 
श्रीसमर्थांच्या विचारांची शुद्धता आणि त्यांच्या मांडणीतील स्पष्टता पाहिली, की जणू त्यांच्यासारख्या अलाैकिक संताऐवजी आधुनिक तर्कशास्त्रांचा पंडितच विवेचन करीत आहे असे वाटते. श्रीदासबाेधाच्या विसाव्या दशकातील ‘चत्वारजिन्नस निरूपण’ या पाचव्या समासामध्ये त्यांनी या संपूर्ण विश्वामधील सर्व वस्तू म्हणजे जिन्नस पाहिले तर ते चार प्रकारांतच सामावून जाऊ शकतात, हे सूत्र स्पष्ट केले आहे. काेणताही जिन्नस घेतला तरी ताे या चारपैकी काेणत्या तरी एकामध्ये बसताेच बसताे. या चारींचीही ते सांकेतिक आकड्यांनी ओळख करून देताना म्हणतात - येथून पाहातां तेथवरी । चत्वार जीनस अवधारी । येक चाैदा पाच च्यारी । ऐसें आहे ।।1।। पहिला जिन्नस म्हणजे निश्चळ निराकार असे परब्रह्म हाेय. ते एकच एक आहे म्हणून श्रीसमर्थ त्याला ‘येक’ म्हणतात. दुसरा जिन्नस म्हणजे त्या ब्रह्मातील चंचळाने झालेली मूळमाया. जिला चाैदा संकेताने ओळखले जाते.
 
म्हणून दुसऱ्या जिन्नसाला ‘चाैदा’ असे ते म्हणतात. तिसऱ्या जिन्नसाला ते ‘पाच’ म्हणतात कारण ताे पाच महाभूतांचा मिळून झालेला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या जिन्नसांमधून निर्माण हाेणारा चाैथा जिन्नस म्हणजे चार खाणींचे सृष्टीमधील असंख्य जीवप्राणी हाेय. त्यांचे अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज अशा चार खाणी म्हणजे प्रकार आहेत. म्हणून श्रीसमर्थ त्याचा उल्लेख ‘च्यारी’ असा करतात.
थाेडक्यात जशी एखाद्या इंजिनची ायरिंग ऑर्डर 3,2,1,4 अशी सांगतात तसे या चार जिन्नसी विश्वाचे आकड्यांमध्ये एक, चाैदा, पाच आणि चार असे वर्णन श्रीसमर्थ करतात.आपण शेतात एकच बी पेरले तरी त्यामधून पुढे उदंड पीक येते, तसाच प्रकार जीवसृष्टीचा हाेऊन तिची अपरंपार वाढ झाली. इतर प्राण्यांना बुद्धी नसल्याने ते आहार, निद्रा, भय, मैथुन यातच अडकून पडतात. पण, माणसाला बुद्धी असल्याने ताे सर्व प्रकारचे भाेग भागू शकताे. हे सुखाचे भाेग आठ प्रकारचे असल्याने त्याला अष्टभाेग म्हणतात. काहींच्या मते अन्न, उदक, तांबूल, पुष्प, शय्या, वसन, चंदन आणि अलंकार हे ते आठ भाेग आहेत.