सार्वजनिक आराेग्य सेवांना एआय तंत्रज्ञानामुळे बळ मिळणार

    19-Mar-2026
Total Views |
 
 

AI
राज्यातील सार्वजनिक आराेग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लाेकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित आधुनिक उपाययाेजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या संस्थेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या करारांतर्गत क्षयराेग, मातृ, नवजात व बाल आराेग्य, प्राथमिक आराेग्य सेवा, ई- हेल्थ आदी क्षेत्रांत एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आराेग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आराेग्य सेवा पाेहाेचवणे हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.क्षयराेग, प्राथमिक आराेग्य सेवा आणि मातृ-बाल आराेग्यासाठी एआय साधनांचा वापर केल्यास लवकर निदान, सुलभ सेवा आणि अग्रिम कर्मचाऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन मिळेल. ही भागीदारी राज्याच्या सार्वजनिक आराेग्य व्यवस्थेला अधिक सक्षम बनवेल, असा विश्वास आबिटकर यांनी व्यक्त केला. वाधवानी एआयचे प्रमुख शेखर शिव सुब्रमणियन यांनीही या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.