ऐराेली-काटई उन्नत मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण; 15 मिनिटांत प्रवास

    08-Jan-2026
Total Views |
 
 

roas 
मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतूक काेंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेला ऐराेली-काटई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात पाेहाेचला असून, या प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. कल्याण, डाेंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणारे लाखाे वाहनचालक आणि प्रवाशांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरणार आहे.सध्या कल्याण-डाेंबिवलीहून नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गे किमान दीड तासाचा कालावधी लागताे. ठाण्यामार्गे प्रवास करताना वाहतूक काेंडी ही माेठी समस्या ठरते. ट्रान्स हार्बर लाेकल हा एकमेव जलद पर्याय असला, तरी वाढत्या गर्दीमुळे त्यावरही ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ऐराेली-काटई उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण हाेणार आहे.एमएमआरडीएने ऐराेली-मुंब्रा प्रकल्पाचा विस्तार म्हणून मुंब्रा-काटई नाका उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हा मार्ग देसाई खाडीवरून जाणार असून, थेट आणि जलद संपर्कासाठी पारसिकडाेंगरातून भुयारी बाेगदा तयार करण्यात आला आहे. 2018 मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले हाेते.प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ठाणे- बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, असा 3.48 कि.मी.चा उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात ऐराेली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत जाेड रस्ता तयार करण्यात येणार आहे. एकूण 6.71 कि.मी.चा हा मार्ग देसाई खाडी ओलांडणार आहे.वर्षाअखेरीस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला हाेण्याची शक्यता आहे.या प्रकल्पातील बाेगदा 4-4 मार्गिकांचा असून, ताे ऐराेली ते डाेंबिवलीजवळील काटई नाक्यापर्यंतचा प्रवास वेगवान करणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐराेली परिसरातील जड वाहनांची वाहतूक कमी हाेईल. मुंबईहून कल्याणकडे जाणारी, तसेच कल्याणकडून मुंबईकडे येणारी वाहने थेट या उन्नत मार्गाचा वापर करू शकतील. परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणडाेंबिवली परिसरातील वाहतूक काेंडी माेठ्या प्रमाणात कमी हाेणार असून, वेळ, इंधन आणि प्रवाशांचा त्रास वाचणार आहे.