देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. ‘मी साधन करताे’ असा अभिमान देहाभिमानाम ुळे उत्पन्न हाेताे. हा साधनाभिमानही, घातक असताे. तेव्हा जे काही हाेते ते परमेश्वराच्या सत्तेने हाेते असे मानीत जावे. आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि ताे सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करीत असताे, तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी, म्हणजे, त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार हाेऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे, बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढेपुढे लवकर आठवण हाेऊ लागेल. ज्याचे मन पुजेत असते त्याची खरी पूजा हाेते.
सर्वांभूती भगवद्भाव आणि काेणाचे मन न दुखाविणे, ही पूजा खरी हाेय. पूजेला बाह्याेपचाराची गरज नसते, मन मात्र अर्पण हाेणे जरूर आहे. पुजेत भाव असणे जरुर आहे. भक्ती आणि वैराग्य यांच्याम ध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती, आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य.
रामराय वनवासाला जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बराेबर न येण्याविषयी सांगितले. त्या वेळी तिने उत्तर दिले की, ‘रामा! तुझ्याबराेबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखाेपभाेग हे मला कष्टमयच आहेत.’ सीता ही रामाची माेठी भक्त हाेती आणि म्हणून तिची अशी अवस्था हाेती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती; पण आपली गाेष्ट तशी नाही.
आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहाेत व दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे. म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा, ताे हा की, आपण म्हणावे, ‘रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.’ असे आपण मन:पूर्वक म्हटले की, परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल. ‘माझ्या देवाला हे आवडेल का?’ अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणाेपासनेचा हेतू आहे.
जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवताे तसतशी आपली उपाधी कमी कमी हाेत जाते. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपाेआप येईल. ‘देव आहे’ असे खऱ्या अर्थाने समजून वागणारे जगामध्ये थाेडेच असतात. म्हणूनच भगवंत ज्या ठिकाणी आहे तिथे त्याला शाेधा. ताे सर्वांच्या हृदयात आहे, म्हणून तिथे त्याला पाहा.