ओशाे - गीता-दर्शन

    09-Jul-2025
Total Views |
 
 

Osho 
मग असे म्हणता येईल का की मी या घाटावरून उडी म ारली, माझी गंगा वेगळी, तुम्ही त्या घाटावरून उडी मारली, म्हणून तुमची गंगा वेगळी, उडी मारताक्षणीच घाट सुटून गेला.पण घाटाघाटांचे फरक जरूर आहेत. जर आपण बराेबर समजलात तर जगातील सगळे धर्म म्हणजे फक्त घाटांचा फरक आहे. ज्यांनी ज्ञान दिले त्या आपल्या उपदेशकांसाठी जैन लाेक जाे शब्द वापरतात ताे ार समर्पक वाटताे. ते त्याला तीर्थंकर असे म्हणतात. तीर्थंकर म्हणजे घाट बनवणारा. तीर्थ घडवणारा. त्याचा अर्थ एवढाच की, या माणसाने आणखी एक घाट बनवला-येथून लाेक उड्या मारू शकतात. तीर्थंकराने दावा गंगेचा केलेला नाही फक्त घाटाचा केलेला आहे. या माणसाने गंगा बनवली, असा दावा केलेला नाही. फक्त एवढाच दावा आहे की, या माणसाने एक नवा घाट बांधला, जेथून नाव साेडता येईल. इतर जे घाट आहेत त्यांचा तीर्थंकराने इन्कार केलेला नाही. म्हणून महावीरांनी कुठल्याही घाटाचा अव्हेर केलेला नाहीये.
 
त्यांनी म्हटले आहे की, इतरही घाट आहेत, त्यांच्याद्वारे कुणीही जाऊ शकताे, असेच त्याने म्हटले आहे.त्यामुळे महावीरांना ार कमी लाेक समजू शकले.कारण महावीरांनी कुणालाच चूक म्हटले नाही.त्यांनी म्हटले ठीक आहे, ताेही एक घाट आहे.हे त्यांनी कुणाला सांगितले आहे? बराेबर - जाे त्यांच्या सांगण्याच्या एकदम उलट बाेलताे त्याला.जाे म्हणताे की मी तुमच्या विराेधात उभा आहे. तुम्ही इकडे घाट बनवला, मी तिकडे बनवला. आपण दाेघे बराेबर कसे असू शकू? त्यालाही महावीर म्हणतात - नाव वल्हवली की आपण एकाच गंगेत पाेहाेचू. तुम्ही जाे तिकडे बराेबर उलट्या बाजूला घाट बनवलात ताे तिकडून उतरणाऱ्यांसाठी नक्कीच उपयाेगी पडेल.