म्हणून या बाबत या सूत्रातून एक गाेष्ट समजून घ्यायला पाहिजे की, फळे आपल्या इच्छेतून येत नसतात, तर आपण जे पेरू त्यातून येत असतात. आपणाला पाहिजे असते एक आणि आपण पेरताे भलतेच काहीतरी. आपण पेरताे विषाची बीजे आणि आपणास पाहिजे असतात अमृताची फळे! मग जेव्हा फळे येतात ती विषाचीच असतात, दु:ख, पीडा यांचीच असतात. नरकाचेच फलित आपल्या हाती पडते.आपण सारे आपल्या जीवनाचे अवलाेकन करू तर आपल्या हे लगेच लक्षात येईल. आयुष्यभर चालूनचालून आपण दु:खांच्या खाचखळग्यांशिवाय दुसरीकडे काेठेही पाेहाेचताेय असे दिसत नाही. राेजच्या राेज दु:ख मात्र आणखी वाढत जाते. राेज रात्र संपत नाही, राेजच्या राेज ती आणखीच माेठी हाेत जाते.
राेजच्याराेज मनावर दु:खाचे काटे तर पसरतच जातात आणि आनंदाची फुले उमललेली मात्र कुठेच दिसत नाहीत.दु:खांचे माेठमाेठे दगड आपल्या पायाला बांधले जातात.पण ज्या आनंदाच्या शाेधात आपण आहाेत, त्या आनंदात पाय नृत्य करू शकत नाहीत. मग त्याला आपणच, हाे आपणच-कारण आहाेत. दुसरे तिसरे काेणीही नाहीकाही ना काही-काहीही चुकीचे, बीज आपण पेरून टाकताे. या चुकीच्या पेरणीतच आपण आपले शत्रू सिद्ध हाेताे. आपण काय पेरत आहाेत याचा विचार आपण पेरतानाच केला पाहिजे.एखाद्या क्राेधाचे बीज पेरून शांतीची फळे मिळवू पहावीत किंवा तिरस्काराची बीजे पेरून प्रेमाची फळे मिळवू पहावीत किंवा सभाेवार शत्रूच शत्रू पसरवित राहणाऱ्याला सगळेजण आपले मित्र व्हावेत असे वाटावे, ही माेठी आश्चर्याची गाेष्ट आहे.